मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महावितरण शेतीच्या लाईटचे बदललेले वेळापत्रक

संतोष माने SM News: नमस्कार शेतकरी बांधवांनो. .. महावितरण शेतीविभागाच्या लाईटचे वेळापत्रक पुन्हा बदलले आहे, ते खालीलप्रमाणे; मार्च 2018 करिता; राञी 11:55 ते सकाळी 09:55 सकाळी 09:55 ते सायं. 05:55 एप्र...

आरग ता. मिरज येथे शिवचरिञकार ह.भ.प. गंगाधर महाराज कुरूंदकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न

संतोष माने SM News:         आरग ता. मिरज येथे संत गाडगेमहाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 09.00 वा. विठ्ठल मंदिर, आरग येथे प्रसिद्ध शिवचरित्रक...

आरग ता. मिरज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

संतोष माने SM News:             आरग येथे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आरग गावातील विविध मंडळाच्या शिवप्रेमी ...

आरगमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Santosh Mane SM News:           आरग ता. मिरज येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी होणार्या पालखी मिरवणुकीत गावातील सर्व शिवप्रेमी तरूण व विविध मंडळे सहभागी होऊन अनेक ठिकाणी छञपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.              सायंकाळी 04:00 वाजता शिवमुद्रा ढोल-ताशा पथक आरग यांची भव्य मिरवणूक होणार आहे.            तसेच मोरेश्वर शिवजयंती महोत्सव, आरग या मंडळाच्या वतीने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 ते 12:00 निबंध स्पर्धा यामध्ये लहान गट, मोठा गट, तसेच रांगोळी स्पर्धा, घरोघरी शिवजयंती सणांप्रमाणे साजरी व्हावी यांसाठी  शिवप्रतिमा सजावट स्पर्धा व सायंकाळी 07:00 ते 08:00  व्याख्यानाचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी 12:00 ते 03:00 महाप्रसादाचे आयोजनही केले आहे.           तसेच छञपती सोशल फौंडेशन आरग यांचेवतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 05:00 वाजता लहान ...

माझा पहिला ब्लॉग

Santosh Mane SM News Arag:    शिवरायांचा वारसा                       नदीचा उगमस्थान कुणी कुणी पाहिलाय. केवढा असतो हो नदीचा उगमस्थान. अगदी छोटासाच झरा असतो. हो ना? पण नदी किती मोठी असते. खूप मोठी असते ना! मग नदीचा उगम इतका छोटा आणि नदी एवढी मोठी! कसं काय बरं शक्य आहे? नदी मोठी असण्याचं एकच कारण आहे. कारण नदी स्वतःमध्ये अनेक झरे मिसळून घेते. अनेक छोटे-मोठे झरे मिसळून घेत-घेत नदी दिसेल त्या मार्गाने पुढे-पुढे जातच असते. मग त्या वाटेवर कुणी आडवं आलं तर ती त्यालाही सोबत घेते. जर सोबत नाही घेता आलं तर त्याच्या नादाला न लागता आपला मार्ग बदलते, माञ ध्येय नाही बदलत. अनेक अडचणींना सामोरे जात नदी शेवटी समुद्रामध्ये सामावते.         तसंच आपल्या मनातील विचारांचं आहे. आपल्या मनात शेकडो विचार घोळत असतात. काही चांगले तर काही वाईट. त्यातीलच एखादा चांगला विचार समाजामध्ये बदल घडवणारा असतो. त्या एका चांगल्या विचाराला योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली कि त्या विचाराचे एका चांगल्या संकल्पनेत रूपांतर होते आणि त्या संकल...